Palghar Nargrik

Mh 48 मुंबई अहमदाबाद हाईवे इद्रीस भाई सोळंकी यांची उत्तम कामगिरी…..

पालघर:- इद्रीस भाई सोळंकी यांनी आपले वाहन, ॲम्बुलन्स, ऑटो रिक्षा, कधी मोटरसायकल वर अपघातातील गंभीर जखमींना वेळेवर रुग्णालयात पोहोचल्याने अनेक जखमींचे प्राण वाचवण्यास मोलाची मदत झाली आहे.

मा. भूषणकुमार उपाध्याय, अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या मृतुन्जय दूत या योजने अंतर्गत नेमलेले मृत्युंजय दूत इद्रीस भाई सोळंकी यांनी एम एच 48 महामार्गवर चारोटी म पो केंद्र हद्दीत अनेक अपघातात जखमींना वेळोवेळी मदत करून माणुसकीचा प्रत्यय दिलेला आहे. त्यांनी आतापर्यंत जखमींना केलेल्या मदतीबाबत त्यांचा म पो केंद्र चारोटी चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अनिल रायपुरे यांनी पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव केला

Leave a Comment