Palghar Nargrik

अपहरणप्रकरणी बोईसर पोलिसांची मोठी कामगिरी; सहा बेपत्ता मुलांचा यशस्वी शोध पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

प्रतिक मयेकर 

बोईसर: पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत एकूण सहा बेपत्ता मुलांचा ठावठिकाणा लावून त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या कुशीत परत आणले. २०२४ मध्ये एक आणि २०२५ मध्ये तब्बल पाच असे एकूण सहा अपहरणाचे गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणांमध्ये चार अल्पवयीन मुली आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. पोलिसांच्या अचूक तपास आणि अथक प्रयत्नांमुळे ही मुले वेगवेगळ्या राज्यांतून शोधून काढण्यात आली.

विविध राज्यांतून शोध

बोईसर पोलिस पथकांनी या गुन्ह्यांचा तपास करत असताना पश्चिम बंगाल, सुरतसारख्या दूरच्या ठिकाणी जाऊन तपासाचे कातडे उपसले. अपहरण झालेल्या मुलांमध्ये १५ वर्षांची साडे पंधरा वर्षांची मुलगी पश्चिम बंगालमध्ये, तर १९ वर्ष १ महिन्यांची मुलगी सुरतमध्ये आढळून आली. इतर मुलांमध्ये १७ वर्षे, १४ वर्षे, १६ वर्षे ७ महिने आणि १४ वर्षांचे अपहरण झालेले किशोरवयीन मुले होती.

पोलिसांचा अविरत प्रयत्न आणि यश

ही सर्व मुले पालकांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. अनेक पालकांनी पोलिसांना आभार मानत, “आमच्या मुलांना परत आणल्यामुळे आम्हाला पुन्हा जगण्याचे कारण मिळाले आहे,” अशी भावना व्यक्त केली.

बोईसर पोलिस ठाण्याचे हे यश सामान्य तपासाची मर्यादा ओलांडून माणुसकीच्या मूल्यांना साजेसं ठरतंय. या तपासामध्ये पालघरचे पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक, आणि बोईसर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांचं कुशल मार्गदर्शन लाभलं.

पथकाची कौतुकास्पद साथ

या यशामागे सहायक पोलिस निरीक्षक चौधरी, पोलिस उपनिरीक्षक मुंढे, उपनिरीक्षक गायडे आणि इतर कर्मचाऱ्यांचं सातत्यपूर्ण मेहनतीचे योगदान आहे. त्यांच्या कार्यामुळे आज सहा कुटुंबांमध्ये पुन्हा हास्य फुलले आहे.

Leave a Comment